New

गुढीपाडवा, GudiPadwa

             गुढीपाडवा

  


        चैत्र महिना मराठी महिन्यांतला पहिला महिना त्या महिन्यातला पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा नवसत्त्व स्वरांचा म्हणजे नव वर्षाचा पहिला दिवस या दिवशी दारोदारी गुढी उभारून ह्या नवीन सुरू होणाऱ्या वर्षाचे स्वागत केले जाते ह्या दिवशी गुढी उभारायची ही आपल्या भारतीय संस्कृतीत जुनी परंपरा आहे परंपरा जुनी म्हणजे किती तर असं सांगतात की त्या ब्रह्मादेवाने जीव आहे सकल सृष्टी निर्माण केली त्या वस्तू मंत्राचा कार्यारंभ आजचा हा दिवस म्हणून गुढी लावायची प्रभू रामचंद्र हे चौदा वर्षांचा वनवास संपवून अयोध्येला परत आले हा दिवस त्या दिवशी सकल आयोध्या वासिी यांनी गुढ्या तोरणे उभारून श्रीरामाचा स्वागत केलं तो हा दिवस

.          ह्या चैत्र महिन्यात जर सभोवतालच्या सृष्टीचे अवलोकन केलं तर असं लक्षात येतं की सुख न झालेली सृष्टी पानांची मोठ्या प्रमाणावर झालेली पानगळ निष्पन्न झालेले वृक्ष हे आता चैत्राच्या नव-नवीन फुललेले असतात वसंत ऋतूची चाहूल  हीि कोकीळ कंठातून फुटणाऱ्या सुसरा ने लागलेली असते निसर्गातल्या परिवर्तनाचा नवा चैतन्याचं नवा सृष्टी चे स्वागत दावे
ळी म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर ही गुढी उभारायची असते
 
         चैत्र शुद्ध प्रतिपदेला लवकर उठावे मंगलस्नान करावे आणि सूर्योदयाच्या वेळी म्हणजे ब्रह्म मुहूर्तावर ही गुढी उभारायची असते.

 आता गुढी कशी तयार करायची?
gudipadwa
                                                   

         एक उंच काठी घ्यायची त्या काठीच्या वरच्या टोकाला रेशमी वस्त्र., कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने फुलांची माळ, व साखरेची गाठी या वस्तू बांधायच्या. त्यावर तांब्याच्या पितळेच्या नाहीतर काशाचा गट्टू लावायचा हे तयार केलेली गुढी दारासमोर लावायची गुढी लावायची ती जागा स्वच्छ करून धुवून पुसून त्यावर रांगोळी काढावी. तिथे नीट बांधावी. काठीला गंध, -फू फुलं अक्षता लावाव्यात गुढीची पूजा करावी निरांजन लावावे. उदबत्ती   दाखवावी. दूध साखरेचा, पेढ्यांचा वगैरे नैवेद्य दाखवावा दुपारी गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा हळद कुंकू, फुले वाहून अक्षता टाकून ही गुढी उतरवण्याची आपल्याकडे प्रथा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी वर्षारंभ होतो म्हणून त्या दिवशी पंचांग पूजन करून  त्यातील नव संवाद स्तर फल वाचले जाते.

           चैत्र प्रतिपदा हा दिवस साडेतीन मुहुर्तातला एक म्हणून ह्या दिवसाला महत्त्व आहे. ह्या दिवशी नवीन वस्तू खरेदी, व्यवसाय प्रारंभ,  नव उपक्रमाचा प्रारंभ इत्यादी, गोष्टी केल्या जातात. सुवर्ण खरेदी  हा त्यातलाच एक भाग. त्यादिवशी कडुलिंबाची पानं खायला लावतात त्यामागचेी शास्त्रीय कारण असं की ह्या कडुलिंबाच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते वर करणी कडु असणारी ही वनस्पती आरोग्यदायक, आरोग्यवर्धक आणि आरोग्यदायी आहे, पचनक्रिया सुधारणे, पित्तनाशक करणे, त्वचारोग बरे करणे, धान्यातील कीड थांबवणे हे आणि असे अनेक औषधी गुण ह्या कडुलिंबाच्या अंगी आहेत. दारी उभारलेली गुढी हे मांगल्याचं,  पवित्र याचं समृद्धीचे प्रतीक आहे. ह्या दिवशी आनंद साजरा करीत आप्तेष्टांना नववर्षाचे अभिष्टचिंतन ही केले जाते. ह्या कॉल यापासूनच श्रीराम जन्मोत्सवाच्या कार्यक्रमाचा सुद्धा प्रारंभ होतो

             ह्या शुभ गोष्टी याच दिवशी घडल्या म्हणून घरोघरी वर्षप्रतिपदेच्या दिवशी वेळूची काठी स्वच्छ धुवून, तिला तांबडे वस्त्र नेसवून, फुलांची माळ व साखरेची गाठी बांधतात, टोकावर चांदीचे किंवा तांब्याचे फुलपात्र पालथे ठेवतात. मग अशीच सजवलेली गुढी घराच्या दाराशी उंच गच्चीवर लावून आनंद साजरा करतात. या पाडव्याच्या शुभदिनी नव्या वर्षात सहकार्य करण्याचा संकल्प करावा व शुभेच्छा व्यक्त कराव्यात.

        गुढी हे स्वागताचे प्रतीक आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत